Sunday, January 29, 2017

सातपुड्याच्या कुशीत



मध्यप्रदेशात भटकंती करताना आवर्जुन भेट देण्यासारख  ठिकाण म्हणजे भेडाघाट मार्बल रॉक. जबलपुर पासून अवघ्या १० किमी वर. तिथल आणखी एक आकर्षण म्हणजे धुवाँधार धबधबा. येथे जाण्याच्या मार्गावर अनेक संगमरवरी कलाकुसरीच्या वस्तुंची दुकान आहेत. 
                                                                    धुवाँधारचा जलप्रपात 


                                                         
थोड्याच वेळात समोर दिसतो तो फेसाळत खाली कोसळणारा जलप्रपात . पाहून अचंबित व्हायला होत. नाव अगदी सार्थ करणारा धुवाँधार. कोसळत असते ती पांढरीशुभ्र जलधारा. पाण्यावर  जणू काही धुराचे लोट. खाली खळाळणारं पाणी. आल्हाददायक  अस वातावरण. धुवाँधार अक्षरशः  डोळ्यांचे पारणे फेडतो.  हे सगळ पाहून धबधब्यात न भिजताही मन ओल चिम्ब होउन जात. पावलं निघायच नावच घेत नाहीत. आता वेळ होती ती नर्मदेच्या पात्रातून  संगमरवरी शिळांच्या सानिध्यात नौका  सफरीची. नर्मदेचं शांत पाणी. दोन्ही बाजूने संगमरवरी शिळा. अतिशय सुंदर विलोभनीय. त्यात नावाड्याचं रसाळ काव्यमय वर्णन भर टाकतं. तो अनेक पुराणातले, सिनेमांच चित्रीकरण झाल्याचे संदर्भ देतो. या शिला आपल्याला वेगवेगळ्या आकारांत ब्रम्हा  विष्णु,महेश अशा अनेकविध  आकारांत दिसतात. फ़क्त गरज सौंदर्यदृष्टिची. त्याच  ते एक वाक्य आठवत "समझे तो आर्ट नहीं तो मॉडर्न आर्ट". जवळपास तासभर केलेली ही  सफर केवळ अविस्मरणीय अशी होती. 

                        नर्मदेतील संगमरवरी शिळांचं मनोहारी दृश्य कितीही पाहीलं तरी मन भरतचं नाही.         
   
मध्यप्रदेशात अनेक जंगले आहेत. त्यातलच एक मधाई म्हणजेच सातपुडा नॅशनल पार्क. १५०० चौ .किमी क्षेत्रफळ असलेल हे जंगल. सातपुड्याच्या रांगांनी वेढलेलं. वाघांसाठी राखीव असलेल जंगल. देनवा नदीच्या काठावर एका वेगळ्या तिन्हीसांजेचा अनुभव घेऊ शकतो. विस्तीर्ण असा देनवाचा जलाशय डोंगररांगानी वेढलेला. मावळत्या दिनकराची डोंगरापल्याड जाण्याची लगबग. अनेकविध पक्षांचा मुक्त विहार. या ठिकाणी अनेक दुर्मिळ पक्षांच दर्शन घडत. मधेच एखादी विहार करणारी नौका. वातावरणाचा बदलत जाणारा रंग. पाण्यावरही पसरलेली लाली. अतिशय विहंगम दृश्य.  जणू काही सोहळाच असल्यासारखा. या सोहळ्याच नेत्रसुख घेण्यासाठी आसनस्थ व्हाव आणि रंगमच्याकडे पाहत रहावं. ही रमणीय अशी संध्याकाळ पाहून मन रमल नाही तर नवलच. हे सार टिपण्यासाठी कॅमेरा अस्वस्थ होत राहतो. हे सार कॅमेऱ्यात अणि मनाच्या कप्प्यात साठवत होतो.  क्षितिजावर डोळे स्थिरावले भास्कराला निरोप देण्यासाठी. वातावरणात थोडासा  गारवा. थोड्याच वेळात सूर्य डोंगराआड विसावला. निरोप समारंभ  पार पडला. सर्वत्र संधिप्रकाश पडलेला. या संधिप्रकाशात  भवतालचा परिसर वेगळाच भासत होता. अशी ही अविस्मरणीय संध्याकाळ. 
                                                     देनवाच्या तीरावर बसून पाहिलेला सूर्यास्त 
                                                                  पोटापाण्याची सोय करताना 

दुसरा दिवस जंगल भ्रमणाचा. मधाई सफरीसाठी बोटीने पलीकडे जावे लागते. मनात उत्सुकता होती.  जिप्सी तयार होतीच. या जंगलाच वैशिष्ट्य म्हणजे येथे लांबच लांब रांगा नसतात. जिप्सिच्याही ठराविक फेऱ्या असतात सकाळी ११ व संध्याकाळी ११. एका वाहनात ५-६ माणसं.  गाइड अणि चालक अशी जोड़ी होती. गरजेच्या सूचना देत आमची जंगल सफर सुरु  झाली. समोरच एका गवताळ कुरणात चितळांची झुंड नजरेस पडली. मनसोक्त बागडताना. गाइड ने माहिती देण्यास सुरुवात केली. येथील गाइड व जिप्सी चालक प्रशिक्षित व कुशल आहेत. झाडे पक्षी प्राणी याविषयी सखोल माहिती आहे. उत्सुकतेपोटी विचारलेली माहिती त्यानी अत्यंत चांगल्या प्रकारे सांगितली. हे जंगल अतिशय घनदाट असे आहे. सूर्य उगवत होता. कवडसे झाडांमधून झिरपत होते. पक्षांचा किलबिलाट बाकी वातावरणात स्तब्धता. एकूणच प्रसन्न अशी जंगलातील सकाळ. तज्ज्ञांच्या मते भारतात मधाई येथे  महाकाय गवा रेडे,सांबर  आढळतात. या सफ़रीत अनेक प्राणी , पक्षी पाहिले पण व्याघ्र दर्शन काही झाले नाही. तरीही काहीतरी वेगळ अनुभवल्याचा आनंद मात्र ओसंडून वाहत होता. वाघाच्या पलीकडे जंगलात इतर पाहण्यासारख आहेच की. त्यामुळे वाघ म्हणजे सर्व काही हा विचार सफर करताना सोडून सफरीचा आस्वाद घ्यावा.  हे सर्व पाहताना वेळ कसा निघुन जातो कळतच नाही. अवर्णनीय अशी सफर. एकदा अनुभवावी अशी. 

                                                                          अपनेही धुनमें 

                                                                            किंगफिशर 








                                                             गाइड व जिप्सी चालक सोबत 
 प्रसन्न सकाळ 



















                                                                          

Wednesday, January 18, 2017

अनवट वाटांवर (कुंजरगड ,आजा डोंगर,कात्राबाई डोंगर)

काही वाटा या अनवट असतात. या वाटांवर भटक्यांची पावलं पडली कि यादेखील सुखाऊन जातात. अशाचं अनवट वाटांवर जाण्याचा मनसुबा केला. प्रसादच नियोजन होत. एकदम कड़क प्लान. गडकिल्ल्याची श्रीमंती लाभलेल्या नगर जिल्ह्यात भटकंती. सगळे भिडू पुणेकर असल्याने पूण्यास जावे लागणार होते. सह्याद्रीच्या भेटीसाठी एव्हडी मेहनत करण्यास तयार  झालो सह्याद्रीच्या दर्शनासाठी सह्याद्री एक्सप्रेसने पूण्यास कूच केलं. नगरचे गड किल्ले पालथे घालायचे होते. रात्री नारायणगावला मस्त थंडीत मसाला दुधाचा आस्वाद घेत पुढे निघालो. सुमारे चारच्या सुमारास विहीरगावात डेरेदाखल झालो. बसमधून उतरताच नगरच्या शरीर गोठवणाऱ्या थंडीने आमचं स्वागत केलं. पारा चांगलाच खाली गेला होता. थोड्याच वेळात सारे स्लिपींग बँगमध्ये गडप झाले. थोडीफार झोप होते न होते तोच सकाळचे सहा वाजले व कुंजरगडाकडे मार्गक्रमण सुरू झालं. हा गड हत्तीसारखा दिसतो म्हणून कुंजरगड. सुरूवातीस सोपी वाटणारी वाट खडी होत होती. सकाळचं प्रसन्न असं वातावरण असल्यामुळे तेवढी दमछाक होत नव्हती. वर एक मंदिर लागतं तिथे काळोबा व मारूतीच्या मूर्तीच धावतं दर्शन घेत पुढे कूच केलं. ट्रँव्हर्स पार करत एक छोटा चढाईचा टप्पा ओलांडत भुयारापाशी आलो. हे जवळपास ३० फूटांचे आरपार भुयार आहे.हे भुयार या गडाचं मुख्य आकर्षण आहे.